नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) केंद्र सरकारच्या ‘नियंत्रणात’ नाही, असे केंद्र सरकारने गुरुवारी प्राथमिक आक्षेप नोंदवताना सर्वोच्च न्यायालयात सांगितले. राज्याने सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली असतानाही सीबीआय एफआयआर दाखल करत आहे आणि त्याचा तपास पुढे चालू ठेवत प्रादेशिक अधिकारक्षेत्रातील प्रकरणांची चौकशी करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगाल सरकारने राज्यघटनेच्या कलम १३१ अन्वये केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात मूळ दावा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा – खरगे यांचे पंतप्रधानांना दुसरे पत्र

missing women, High Court, State Govt,
बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का ? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, पोलिसांना विचारणा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
kolkata rape and killing supreme court asks centre states to take urgent steps for doctors safety
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचला ; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र, राज्य सरकारांना निर्देश
State Government, High Court, Ratnagiri, Chiplun, aaple Seva Kendra, Service Centers, Scam, Public Interest Litigation, Affidavit, Transactions
आपलं सरकार सेवा केंद्रात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप : रत्नागिरीतील १६, तर चिपळूणमधील २९ सेवाकेंद्र बंद
The High Court issued a warning to the State Government regarding the Advisory Board for the Disabled Mumbai news
सप्टेंबरपर्यंत अंपगांसाठीचे सल्लागार मंडळ कार्यान्वित करा; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले
bharat bandh on august 21
Bharat Bandh : २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या ‘बंद’मागचं नेमकं कारण?
Supreme Court warning on compensation to stay state government free schemes
राज्य सरकारच्या मोफत योजनांना स्थगिती देऊ! नुकसान भरपाईवरून सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
Supreme Court warns state government regarding Ladaki Bahine Yojana print politics news
अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

केंद्रातर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती बीआर गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, घटनेचे कलम १३१ हे सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आलेले ‘सर्वात पवित्र’ अधिकारक्षेत्र आहे आणि या तरतुदीचा गैरवापर करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. ते म्हणाले की, राज्याने दाखल केलेला खटला आणि त्यात नमूद केलेले खटले केंद्र सरकारने नोंदवलेले नाहीत.

मेहता म्हणाले, ‘‘भारत सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. सीबीआयने त्याची नोंद केली आहे. सीबीआय या प्रकरणाची सुनावणी भारत सरकारच्या नियंत्रणाखाली करत नाही. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला तपासाबाबत किंवा राज्यात छापे घालण्याबाबत दिलेली ‘संमती’ मागे घेतली होती.