श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे जुमागुंड भागात शोधमोहीम राबवली. त्यात पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हे सर्व दहशतवादी परदेशी होते, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ट्वीटद्वारे सांगितले. या वर्षांत काश्मीरमध्ये इतक्या मोठय़ा संख्येने दहशतवादी मारले जाण्याची ही पहिलीच घटना आहे. स्थानिक तरुणांनी दहशतवादाकडे पाठ फिरवल्यामुळे सध्या खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांची संख्या कमी झाल्याचे पोलीस आणि सैन्याचे म्हणणे आहे. यापूर्वी १३ जूनला कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.

forest fire
उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग; लष्कर, हवाई दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
Manipur Violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; CRPF जवानांवर हल्ला, दोघांचा मृत्यू
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी