भारतीय लष्करातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी मोठे पाऊल उचलत आपल्या अधिकाऱ्यांच्या केडरमधील सुधारणेच्या मोठ्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, जुन्या कमांड्स संपुष्टात आणून त्याला आकारबद्ध करण्याबरोबरच वाढत्या खर्चावर नियंत्रणही आणले जाणार आहे. सैन्यदलातील सुधारणा करण्याची ही योजना अनेक काळापासून प्रलंबित होती. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये (एसीसी) प्रमुख धोरण आणि कार्यकारी मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर या योजनेला मंजुरी देण्यात आली.

सैन्यदलातील सूत्रांनी सांगितले की, सुधारणावादी पाऊल योजनाबद्ध पद्धतीने आणि वेगाने लागू केले जाणार आहेत. आठवडाभर चालणाऱ्या सहामाही परिषदेला ९ ऑक्टोबरला सुरुवात झाली. लष्करप्रमुख बिपिन रावत हे स्वत: या परिषदेचे अध्यक्ष आहेत. ऑपरेशनल आणि अंतर्गत प्रशासकीय मुद्यांशिवाय परिषदेत चीन- पाकिस्तान सीमारेषेशी निगडीत आव्हानांवरही चर्चा झाली.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमांडरनी सुधारणावादी निर्णय कालबद्ध पद्धतीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व निर्णयांचे प्रत्येक बाजूने मूल्यांकन केले जाईल आणि गरज पडल्यास संशोधनही केले जाईल. सैन्यदलाच्या मुख्यालयाने दलाच्या कार्यक्षमतेचा विस्तार करणे, बजेट खर्च कमी करणे, आधुनिकीकरण आणि आकांक्षांवर ध्यान देण्याच्या दृष्टीने समग्र अध्ययन केले होते. या सुधारणा योजनाबद्ध पद्धतीने लागू केले जातील, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले.

आनंद म्हणाले की, ‘रि-ऑर्गनायजेशन अँड राइट-सायजिंग ऑफ द इंडियन आर्मी’ ऑपरेशनल आराखड्याला दक्ष बनवणे आणि भविष्यासाठी तयार करण्याच्या उद्धेशाने करण्यात आले आहे. विशेषत: पश्चिम आणि उत्तर भागातील सीमांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. दुसरी सुधारणा लष्कर मुख्यालयाच्या रि- ऑर्गनायजेशनशी निगडीत होता. तिसरी सुधारणा ही अधिकाऱ्यांच्या केडरच्या समिक्षेवर केंद्रीत होती. तर चौथी सुधारणा ही रँकनुसार जबाबदारीची समिक्षाशी निगडीत होती.