पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गोरखा रेजिमेंटचे राजीब थापा शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या गोळीबारात गोरखा रेजिमेंटचे जवान राजीब थापा शहीद झाले.

याआधी १८ ऑगस्टला पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. त्यावेळी लान्स नायक संदीप थापा शहीद झाले होते. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. पाकिस्तानच्या कारवाया वाढल्या आहेत. शस्त्रसंधीचं उल्लंघनही केलं जातं आहे.