लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांना तुफान यश मिळाले. भाजप युती (NDA) एकूण ३०० हून अधिक जागांवर विजयी झाली. महाराष्ट्रातही भाजप शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेले ओम राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राणा जगजीतसिंह पाटील यांना मोठ्या फरकाने पराभूत केले.

उस्मानाबादमधील अंतिम निकालात एकूण १२ लाख ४ हजार ३७० मतांची मोजणी करण्यात आली. त्यात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना ५ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राणा जगजीतसिंह पाटील यांना कांटे की टक्कर देता आली नाही. त्यांना एकूण ४ लाख ६९ हजार ७४ मतांवर समाधान मानावे लागले. तर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांना केवळ ९८ हजार ५७९ मते मिळाली. या मतदारसंघात तब्बल १० हजार २४ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दर्शवली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

Bapusaheb Pathare, Sharad Pawar group,
अखेर भाजपा नेते बापूसाहेब पठारे यांचा शरद पवार गटात प्रवेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Shinde faction leader Shambhuraj Desai and Thackeray faction leader Ambadas Danve took darshan of Shrimant Dagdusheth Halwai Ganapati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतले दर्शन
Mohan Bhagwat, Chandrapur, RSS,
सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याचा चंद्रपुरात जाहीर निषेध, आंदोलन
Prataprao Bhosale grandson Yash Raj Bhosale met Sharad Pawar satara news
प्रतापराव भोसलेंचे नातू शरद पवारांच्या भेटीला; वाईतून उमेदवारीची मागणी
Neelam Gorhe says mahayuti government should come once again under leadership of cm Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे : उपसभापती नीलम गोऱ्हे
Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
Ajit Pawar, RSS Memorial, Ajit Pawar Avoids RSS Founder s Memorial, Hedgewar Smruti Mandir BJP, Nagpur, Deekshabhoomi,
अजितदादांनी दुसऱ्यांदा संघ भूमीवर जाणे टाळले, काय आहे कारण?

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत सेनेचे रविन्द्र गायकवाड यांना येथून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी २ लाख ३४ हजार ३२५ मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. पण यंदा पक्षांतर्गत गटबाजी आणि कामगिरीचा अभाव यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले जात होते. त्या जागी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी सेनेचा गड कायम राखला मात्र विजयाचे अंतर मात्र काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.