पाकिस्तानने १९९९ साली लाहोर कराराचे उल्लंघन केलं, ती आपली चूक झाली, अशी कबुली पाकिस्ताने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. पाकिस्तानने केलेल्या पहिल्या अणुचाचणीला आज २६ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही कबुली दिली.

हेही वाचा – “आधी तुमचा देश सांभाळा”, निवडणुकीवर भाष्य करणाऱ्या पाकिस्तानी नेत्याला अरविंद केजरीवालांनी सुनावले

rahul gandhi jiu jitsu aikido
राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जिउ-जित्सू’ आणि ‘आयकिडो’ यांचा केला होता सराव, ते काय आहे?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Kolkata Rape-Murder News
Kolkata Rape-Murder : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपीच्या वकील म्हणून नियुक्त झालेल्या महिला वकील कोण?
wfi president sanjay singh comment on vinesh phogat
विनेशने कुस्तीत राजकारण करू नये!‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष संजय सिंह यांची टिप्पणी
bangladesh interim govt head muhammad yunus assured safety security of hindus
Muhammad Yunus on Hindu Safety : मोहम्मद युनूस यांच्याकडून हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन
extradition with India for Sheikh Hasina
शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?
bangladesh mourning day
बांगलादेशात १५ ऑगस्ट राष्ट्रीय शोक दिवस म्हणून का पाळतात? अंतरिम सरकारने या दिवसाविरुद्ध घेतलेल्या नव्या निर्णयाने वाद का पेटलाय?
Sheikh Hasina demand to investigate the Bangladesh violence murders
हिंसाचार, हत्यांची चौकशी करा! शेख हसिना यांची मागणी, राजीनाम्यानंतर पहिलेच जाहीर वक्तव्य

नेमकं काय म्हणाले नवाज शरीफ?

“२८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर काही महिन्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तापित करण्याच्या उद्देशाने लाहोर येथे एक करार करण्यात आला. आपण पाकिस्तानने १९९९ साली कारगिल युद्धाच्या रुपाने त्या कराराचं उल्लंघन केलं. ती आपली चूक झाली”, अशी प्रतिक्रिया नवाज शरीफ यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी इम्रान खान यांनाही लक्ष्य केलं. “पाकिस्तानने अनुचाचण्या करू नये, यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी ५ अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी ते पैसे घेण्यास नकार दिला. माझ्या ऐवजी जर इम्रान खान सारखी व्यक्ती असती, तर त्यांनी नक्कीच ते पैसे घेतले असते”, अशा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – श्रीलंकन सरकार ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करून मायदेशी पाठवणार, दोन्ही देशांमध्ये मोठा करार

लाहोर करार नेमका काय होता?

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी लाहोर येथे एका करारावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तापित करणे तसेच नागरिकांमध्ये संपर्क वाढवणे या कराराचा मुख्य उद्देश होता. मात्र, या करारावर स्वाक्षरी झाल्याच्या काही महिन्यांनंतर पाकिस्तानने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परिणामता दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले. या युद्धालाच कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते.