नवी दिल्ली : विधी आयोग संविधानात ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ याबाबत नवीन प्रकरण जोडून २०२९ च्या मध्यापर्यंत देशभरात लोकसभा, राज्यसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची शिफारस करू शकतो. अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. न्यायमूर्ती (निवृत्त) रितुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील आयोग एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत ‘नवे प्रकरण किंवा कलम’ जोडण्यासाठी घटना दुरुस्तीची शिफारस करेल. आयोग पुढील पाच वर्षांत ‘तीन टप्प्यांत’ विधानसभांचा कार्यकाळ एकत्र करण्याची शिफारस देखील करेल, जेणेकरून मे-जून २०२९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच पहिल्यांदाच देशभरात एकाचवेळी निवडणुका घेता येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा