लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ५ एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविण्याचे आश्वासनासह तीस लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. “काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला. ते उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या रॅलीला संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“पहिली काँग्रेस आता राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचे दिसून येते. तसेच जाहीरनाम्याचा काही भागावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिसतो आहे. काँग्रेस ज्या उमेदवाराला तिकीट देते तो उमेदवार दुसऱ्या दिवशी काँग्रेस सोडत आहे. आज उरलेल्या काँग्रेसकडे राष्ट्रहिताची काहीच धोरणे नाहीत. देशाच्या विकासासाठी काही धोरणदेखील नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Sharad Pawar, NCP, Chief Minister, Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray, Shiv Sena, Congress, Sanjay Raut,
मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
jay pawar
बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Radhakrishna Vikhe Patil, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना भेटतात हे आश्चर्यकारक – मंत्री विखे
Praniti shinde, Congress Solapur,
सोलापुरात काँग्रेसपुढे पेच
Uddhav Thackeray, Shinde group,
शिंदे गटाकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांचे लक्ष्य भाजपच
High Court Summons to Naresh Mhaske,| BOMBAY HIGH COURT | RAJAN VICHARE FILED PETITION,
राजन विचारे यांच्या याचिकेवर नरेश म्हस्के यांना उच्च न्यायालयाचे समन्स

“महात्मा गांधी यांच्यासह अनेक महान व्यक्ती काँग्रेसबरोबर जोडले गेले होते. मात्र, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी अस्तित्वात असलेली काँग्रेस दशकापूर्वीच संपली आहे. आता जी काँग्रेस राहिली, त्यांच्याकडे देशाच्या हितासाठी काहीही नाही. काँग्रेसने कधीही वंचित, शोषितांचा विचार केला नाही”, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

हेही वाचा : जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 

काँग्रेस उमेदवार देण्याचे धाडस करत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशमच्या सहारनपूर येथे भव्य रॅली पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसने बालेकिल्ला म्हणून मानलेल्या अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघातदेखील काँग्रेस उमेदवार उभे करण्याचे धाडस दाखवू शकत नाही”, असा टोला पंतप्रधान मोदी काँग्रेसला लगावला.

काँग्रेसने जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या?

काँग्रेसने जाहीरनाम्यात तीस लाख युवकांना सरकारी नोकरी, आरक्षणाची मर्यादा वाढवविण्याचे आश्वासन, गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन, शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टींवरील जीएसटी हटविण्याचे आश्वासन, अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविण्याचे आश्वासन तसेच गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याच्या आश्वासनासह आदी मोठ्या घोषणा काँग्रेसने केल्या आहेत.