पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमी सणाला गालबोट लागलं आहे. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाल्यानंतर काही समाजकंठकांनी वाहनं जाळली आहेत. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर येताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमी सण शांततेत साजरा करण्याचं आणि मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. असं असूनही पश्चिम बंगालमधील हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली आहे. रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत गोंधळ झाला आहे. यामध्ये काही समाजकंठकांनी जाळपोळ करत वाहनांना आग लावली आहे.

Cyclone in August after sixty years in the Arabian Sea Pune news
अरबी समुद्रात साठ वर्षांनी ऑगस्टमध्ये चक्रीवादळ
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
west bengal bandh violence
West Bengal : पश्चिम बंगालमधील ‘बंद’ला हिंसक वळण; तृणमूल-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गोळीबार झाल्याचाही दावा, नेमकं काय घडतंय?
Heavy rains in Gujarat many trains cancelled
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…
Low pressure belt, Konkan coast, Heavy rain Konkan,
कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार
Tiger, Resort, tiger enters in resort, Pench Tiger Reserve, Tourists, Madhya Pradesh, Panic, Forest Department, Wildlife,
Video : वाघाला रिसॉर्टमध्ये आली डुलकी, नंतर आले हत्ती; अखेर…
Nagpur has lost its status as green city due to the reduction of green cover due to cement roads
नागपूरमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे हरित आच्छादनात घट, ग्रीन सिटीचा दर्जा हिरावला
Heavy rains in Satara Karad cities
सातारा, कराड शहराला पावसाने पुन्हा झोडपले; पाथरपुंजला साडेबारा इंच असा ढगफुटीसदृश पाऊस

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला, पाहा व्हिडीओ

समाजकंठकांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे अनेक वाहनांना आग लावली…

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एएनआय’ने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “रामनवमीची मिरवणूक काढणाऱ्यांना माझी विनंती आहे की, ती मिरवणूक कृपया शांततेत काढा. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लीम भागातून मिरवणूक काढणं टाळा. रामनवमी शांततेने साजरी करा, हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करू नका. चिथावणी देऊ नका. काही भाजपा नेते म्हणत आहेत की, ते रामनवमीच्या मिरवणुकीत तलवारी आणि चाकू घेऊन फिरतील. पण हा फौजदारी गुन्हा आहे.”