साडी हा भारताचा जगभरात प्रसिद्ध असलेला पोशाख आहे. एकेकाळी केवळ विवाहित महिला साडी नेसत असत. ही त्यांची ओळख होती. मात्र बदलत्या काळानुसार साडी ही फक्त विवाहित महिलांची मक्तेदारी न राहता ती आता सौंदर्याचे प्रतीक म्हणून उदयास आले आहे. आजच्या काळातील महिला कोणाच्याही दबावाखाली नाही तर आपल्या इच्छेने साडी नेसतात.

आपल्या देशात पूर्वापार चालत आलेल्या गोंष्टींमागे कोणते ना कोणते विशेष कारण असते. साडी नेसण्याच्या बाबतीतही असेच एक कारण आहे. साडी हा भारतीय महिलांचा पारंपारिक पोशाख आहे. साडी नेसलेल्या महिला अत्यंत सुंदर दिसतात. भारतातील प्रत्येक राज्यामधील महिला वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसतात. तसेच साडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कापडही वेगवेगळ्या प्रकारचे असते. मात्र तुम्हाला माहित आहे का की साडीच्या खालील भागात फॉल लावण्याची पद्धत कधीपासून सुरु झाली? आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

१८ फुटाच्या अजगराने एका दमात गिळली ५ फुटाची मगर; नंतर अशी हालत झाली की…; Viral Video पाहून उडेल थरकाप

काही रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार साडीमध्ये फॉल लावण्याची पद्धत सुमारे १९७५ साली सुरु झाली. यामागे साडीच्या सुरक्षेचे कारण असल्याचे सांगण्यात येते. विना फॉलची साडी दोन-तीन वेळा नेसल्यानंतर लगेचच साडीचा कापड खालून दुमडू लागतो आणि तो एखाद्या पाईपप्रमाणे गुंडाळला जातो. याउलट जड साड्यांची काठ जमिनीला घासल्याने फाटून खराब होऊ लागते. महागड्या साड्या अशाप्रकारे खराब होणे महिलांसाठी अतिशय दुःखद असू शकते. यासाठीच लोक साड्यांची सुरक्षा करण्यासाठी उपायांच्या शोधात होते. यानंतर दुमडणाऱ्याच्या साड्यांची देखभाल त्यावर इस्त्री करून केली जात असे. मात्र ज्या साड्या जमिनीला घासून खराब होत असत त्यांच्या सुरक्षेसाठी अजूनही काही उपाय मिळाला नव्हता.

याचकाळात, बेलबॉटम पॅंटच्या खालील किनाऱ्यांवर एक पितळेची चैनी लावली जात असे. याच्या मदतीने या पँटची सुरक्षा केली जात असे. मात्र साडीसाठी हा उपाय वापरणे खूपच खर्चिक होते. महागड्या साड्यांना या चैन लावणे फायदेशीर असले तरी कमी किमतीच्या साड्यांसाठी हे खूपच महाग होते. प्रत्येकालाच गी गोष्ट परवडण्यासारखी नव्हती. खूप संशोधन केल्यानंतर मुंबईमध्ये साडीच्या खालील भागावर फॉल लावण्याची कल्पना शोधली गेली. यामुळे साड्यांची किनार खराब होण्यापासून बचाव होऊ लागला.