– ऋषिकेश बामणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमधील हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होणार, हे निश्चित असले तरी भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या या स्पर्धेतील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या हेतूने हे पाऊल महत्त्वाचे आहे. मात्र दर्दी क्रिकेटप्रेमींसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतानेच या स्पर्धेत न खेळवण्याचे ठरवले, तर चाहत्यांचा भ्रमनिरास होईल. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेदरम्यानच भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर असेल. दुसरीकडे ऑक्टोबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असल्याने भारतीय पुरुष संघातील खेळाडूसुद्धा आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याची जोखीम पत्करतील, याची शक्यता कमी आहे. पण भारताचा दुय्यम संघ दोन्ही विभागांमध्ये पाठवण्याइतपत गुणवत्ता आपल्याकडे नक्कीच आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई आणि तत्सम स्पर्धांविषयी बीसीसीआयची उदासीनता ठळकपणे जाणवणारी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India unlikely to field cricket teams in hangzhou asiad scsg 91 print exp 0122
First published on: 21-02-2022 at 07:35 IST