Dream11 IPL 2020 UAE : सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सने आज कोलकाताविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. २०१४मध्ये युएईत झालेल्या ५ सामन्यांत आणि यंदा चेन्नई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे आणि मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना कोलकातावर ४९ धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला. That's that from Match 5 as the Mumbai Indians win by 49 runs. Scorecard - #KKRvMI pic.twitter.com/j58dPCYVQl — IndianPremierLeague (@IPL) September 23, 2020 प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डी कॉक दुसऱ्याच षटकात १ धाव काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी कोलकाताच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. तुफान फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचं अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या. सौरभ तिवारी या सामन्यात लवकर झेलबाद झाला. त्याने २१ धावा केल्या. कर्णधारपदाला साजेशी खेळी करणारा रोहित शर्मा ८० धावांवर बाद झाला. ५४ चेंडूंच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने १९५ धावांपर्यंत मजल मारली. A look at the Points Table after Match 5 of #Dream11IPL 2020. pic.twitter.com/zJjwGqErxE — IndianPremierLeague (@IPL) September 23, 2020 १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुभमन गिल (७) आणि सुनील नारायण (९) स्वस्तात बाद झाले. कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज फलंदाज नितीश राणा यांनी कोलकाताचा सावरला आणि सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. पण राहुल चहरने कार्तिकला पायचीत पकडले. कार्तिकने २३ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावा केल्या. कार्तिकपाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेला नितीश राणादेखील (२४) बाद झाला. मुंबईचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह याने आंद्रे रसल (११) आणि इयन मॉर्गन (१६) यांना एकाच षटकात माघारी धाडले. यंदाच्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला खेळाडू पॅट कमिन्स याने जसप्रीत बुमराहला चांगलाच चोप दिला. त्याने एकाच षटकात बुमराहला चार षटकार लगावले. १२ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावांची तडाखेबाज खेळी करणारा पॅट कमिन्स फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यामुळे मुंबईला ४९ धावांनी विजय मिळवला.