किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलने चक्क भारताचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यावर पुढील  वर्षी बंदी घालण्याची मागणी ‘आयपीएल’ संयोजकांकडे केली आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणता नवा नियम आणावा, या प्रश्नाला उत्तर देताना राहुलने विनोदाने हे मत मांडले. ‘‘विराट-डीव्हिलिसर्य यांच्या खात्यावर पाच हजार धावा जमा झाल्या की त्यांनी थांबावे, अन्य क्रिकेटपटूंना धावा काढायची संधी द्यावी,’’ असे राहुलने म्हटले आहे.