पीएच.डी. करतानाचा कालावधी किंवा संशोधनाचा कालावधी हा शिक्षकपदांसाठी अनुभव म्हणून ग्राह्य़ धरण्यात येणार असून त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यापूर्वीच ‘अनुभवी’ असा शिक्का मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभाग प्रमुख किंवा प्राचार्यपदासाठी पात्रताधारक उमेदवार न मिळण्याचा प्रश्नही कमी होण्याची शक्यता आहे

दिलासा काय?

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार पीएच.डी. हा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. त्यामुळे शिक्षकांनी नोकरी करत असताना पीएच.डी. करायचे असल्यास रजा घेणे अपेक्षित आहे. मात्र महाविद्यालयांकडून शिक्षकांना या रजा नाकारण्यात येतात किंवा पीएच.डी. करत असलेला कालावधी अनुभव म्हणून गृहित धरण्यात येत नाही. पीएच.डी. करत असलेला कालावधी हा अध्यापन अनुभव म्हणून पदोन्नती, वेतनवाढ यासाठी ग्राह्य़ धरण्यात येणार आहे. त्यामुळे पीएच.डी. करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.  संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख या पदांसाठी अनुभव आणि पीएच.डी. असे दोन्ही लागते. मात्र पात्रताधारक उमेदवारच मिळत नाहीत अशी ओरड करून अनेक संस्थाचालकांकडून त्याच प्राचार्याना मुदतवाढ देण्यात येते. मात्र नव्या नियमामुळे या पदांसाठी अनुभव आणि पीएच.डी. असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पीएच.डी.चा कालावधी हा अनुभव म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे.