कोल्हापूर : मराठा समाजाची सरसकट आरक्षणाची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे का हे पाहणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणे गरजेचे आहे. अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल, असे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

आमदार पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात बोलले. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अद्याप बोललेले नाहीत. शासनाने प्रारूप अधिसूचना जारी केली असली तरी त्याबाबत आगामी पंधरा दिवसानंतर काय घडणार याला महत्व प्राप्त झाले आहे. प्रारूप अधिसूचनेबाबत स्पष्टता येण्यासाठी शासनाकडून खुलासा होणे गरजेचे. प्रारूप अधिसूचना आणि यातील कायद्याच्या बाजू, वस्तुस्थिती लोकांसमोर आणली गेली पाहिजे. शासनाचे नेमके धोरण कोणते आहे हे थोड्या दिवसात लोकांना कळेल.

Maharashtra Government to Establish Jain Development Corporation, Announces Chief Minister Eknath Shinde, Maharashtra Government, Jain Development Corporation, Eknath shinde, jain samaj, jain people, jain samaj in Maharashtra, jain samaj Jain Development Corporation, jain mahasangh news, Kolhapur news, cm ekanath shinde news,
जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
mumbai north central lok sabha marathi news
काँग्रेसचे नसीम खान कोणती भूमिका घेणार ?
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

आणखी वाचा-अयोध्येतील सोहळ्यामुळे राज्यातील वस्त्रोद्योगात कोट्यवधींची उलाढाल; श्रीराम नामाचे कुर्ते, शर्ट, साड्यांची मोठी निर्मिती

राहुल गांधी आणि काँग्रेसने पहिल्यापासूनच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षण शंभर टक्के कसे टिकेल हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

विरोधात फूट पडत असल्याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, भाजप इंडिया आघाडी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि लोकसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध देशाची जनता अशी असेल. नितीश कुमार यांचा फारसा परिणाम होणार नाही असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहेच.