रक्षाबंधना दिवशीच लहानग्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तिटवेता(ता.  राधानगरी) येथे घडली. आरोहण संदीप घारे ( वय २ ) असे या बालकाचे नाव आहे. त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे  मोठ्या बहिणीचे राखी बांधण्याची इच्छा अपुरी राहिली.

हेही वाचा >>> कोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन गाभाऱ्यातून सुरू; भाविकांना राखी पौर्णिमेची भेट

Groom dies in UP in wedding day
लग्न सुरू असतानाच नवरा अचानक कोसळला; धडधाकट तरुणाचा एका क्षणात मृत्यू
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल

संदीप घारे यांना आरोही, ओवी या दोन मुली आणि सर्वात लहान आरोहण मुलगा आहे. अलीकडे आरोहण याला आजाराने गाठले. तपासणीमध्ये ब्रेन ट्यूमर झाले असल्याचे निष्पन्न झाले. एप्रिल महिन्यात त्याच्यावर याबाबतची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. पण तेव्हापासून त्याची नजर गेली. आवाजावरून तो माणसे ओळखत असे. मंगळवारी तब्येत बिघडल्याने त्याला एका बालरोग तज्ञाकडे दाखल केले होते. आज त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असताना दोन्ही बहिणीने रुग्णालयात बघण्यास जाण्याचा कुटुंबियांकडे आग्रह केला होता. त्यांनी उद्या रक्षाबंधन साठी त्याला घरी घेऊन येऊ; मग राखी बांधा , असे समजावले होते. मात्र आता हे स्वप्न अपुरे राहिले असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.