विराट अँड कंपनीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना ३१ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान त्यांना पार करता आले नाही. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांतच संपुष्टात आला आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने अॅडलेडवर हा सामना जिंकून १५ वर्षांपासूनची पराभवाची मालिका खंडित केली. भारताने या आधी २००३ साली या मैदानावर सामना जिंकला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आजचा सामना पाहून त्या सामन्याची आठवण झाली. भारताला विजयाच्या शुभेच्छा देणारे ट्विट सचिनने केले. आजच्या विजयामुळे २००३ साली झालेल्या सामन्यातील विजयाच्या आठवणींना उजाळा मिळाला, असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे. What a way to start the series!#TeamIndia never released the pressure. Superb batting by @cheteshwar1 with crucial knocks in both innings, @ajinkyarahane88 in the 2nd innings and excellent contributions by our 4 bowlers. This has brought back memories of 2003. #INDvAUS pic.twitter.com/4gmviaKeCC — Sachin Tendulkar (@sachin_rt) December 10, 2018 २००३ साली भारताने अॅडलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला ४ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात द्रविडने पहिल्या डावात २३३ तर दुसऱ्या डावात नाबाद ७२ धावा केल्या होत्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. या खेळीसाठी द्रविडला सामनावीर घोषित करण्यात आले होते. दरम्यान, व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. Amazing grit displayed by the Australian lower order, but this is a moment to savour for a long time for Team India. The bowlers gave it everything and let’s just enjoy this and carry the momentum into the Perth Test #AusvInd — VVS Laxman (@VVSLaxman281) December 10, 2018