रसेल डोमिंगो यांचा द. आफ्रिकेला सल्ला
ट्वेन्टी-२० मालिकेतील यशाने हुरळून जाऊ नका. भारताशी सामना करताना कधीही गाफील राहून नका, असा सल्ला दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी दिला आहे.
‘‘भारतीय संघ चांगलाच तुल्यबळ आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० मालिकाविजयाने गाफील राहू नका. भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम असून ते कधीही पुनरागमन करू शकतात,’’ असे डोमिंगो म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘भारतामध्ये आम्ही फक्त दोन दिवस क्रिकेट खेळलो आहोत, अजूनही २५ दिवस बाकी आहेत. त्यामुळे या दोन दिवसांतील विजयाने संघाने हुरळून जाऊ नये, त्यांनी सरावामध्ये कोणतीही कसर ठेवू नये. ज्या जोशपूर्ण वातावरणात दौऱ्यावर आलो आहोत तोच जोश कायम ठेवण्याची गरज आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont be overconfident after win t20 series
First published on: 10-10-2015 at 03:42 IST