दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का द्यायला सज्ज झाला आहे.
पहिल्या सामन्यात भारताला ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने यजमानांवर २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे मनोबल उंचावलेला कर्णधार सरदार सिंगचा भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात आपली जादू दाखवायला तयार झाला आहे.
भारताचे प्रशिक्षक टेरी वॉल्श हे ऑस्ट्रेलियाचे असल्यामुळे त्यांना वातावरणाचा चांगला अंदाज आहे, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा भारतीय संघाला चांगला फायदा होत आहे.