भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी आज सोमवार पंधरा सदस्यीय एकदिवसीय संघाची घोषणा केली. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नसून, सध्या चॅम्पियन्स करंडक मालिकेत खेळत असलेला संघच या मालिकेसाठीही कायम ठेवण्यात आला आहे. भारत-श्रीलंका-वेस्टइंडिज दरम्यान ही तिरंगी मालिका २८ जून पासून सुरू होणार आहे.   

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचा भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रोहीत शर्मा, दिनेश कार्तिक, मुरली विजय, सुरेश रैना, उमेश यादव, रविंद्र जडेजा, ईशांत शर्मा, आर.अश्विन, इरफान पठाण, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, विनय कुमार