भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा ट्वेन्टी-२० सामना २७ डिसेंबरला अहमदाबादला होणार होता. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) विनंती केल्यामुळे हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांच्या पाचव्या स्मृतिदिनीच हा सामना होता. त्यामुळे पीसीबीने हा सामना पुढे ढकलण्याची विनंती केली. आता हा सामना २८ डिसेंबरला होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. पाकिस्तानचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन ट्वेन्टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी वर्षांखेरीस भारतात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indo pak ahmedabad t20 postponed by a day
First published on: 16-12-2012 at 12:06 IST