मुंबई आणि रेल्वे यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचा सामना वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे, अशी स्पष्टोक्ती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली आहे.
‘‘१५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणारा मुंबई-रेल्वे रणजी सामना सामना हलवण्यात यावा, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र फार कमी वेळ उपलब्ध असल्यामुळे ती मान्य होऊ शकली नाही. त्यामुळे हा सामना वानखेडेवरच होणार आहे,’’ असे एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले.
नुकताच मुंबई-उत्तर प्रदेश यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात जवळपास १२०० धावा निघाल्या. त्यामुळे मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने हा सामना पवार स्टेडियमवर घ्यावा, अशी विनंती केली होती. वानखेडेवर २५ ऑक्टोबरला झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विक्रमी ४३८ धावा उभारून २१४ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2015 रोजी प्रकाशित
मुंबई-रेल्वे लढत वानखेडेवरच!
मुंबई आणि रेल्वे यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचा सामना वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 14-11-2015 at 00:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy mumbai railways game shifted out of wankhede stadium