आरोग्याची काळजी घेणाऱ्यांना, मधुमेही रुग्णांना नेहमी गोड पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढते जे आरोग्याचे नुकसान होते. पण सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्या आहारात गोड पदार्थांचा समावेश असतो. थोड्या प्रमाणात गोड पदार्थ खाणे आनंददायक असू शकते पण त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यानंतर आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. पण आपण किती प्रमाणात गोड पदार्थ खातो यापेक्षा ते केव्हा खातो हे देखील महत्त्वाचे आहे. गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत DtF च्या संस्थापक पोषणतज्ज्ञ सोनिया बक्षी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले की,”नियमितपणे जास्त गोड पदार्थ खाणे केवळ वजन वाढवते असे नाही तर त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.”

“जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन रक्तातील साखरेची पातळी असंतुलित करण्यास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे मूड बदलू शकतो, थकवा येऊ शकतो आणि अगदी संज्ञानात्मक क्षमतेमध्ये घट देखील होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत अति प्रमाणात गोड पदार्थ खाणे शरीरातील जळजळ, हृदयरोग, मूड डिसऑर्डर आणि विविध कर्करोगांसंबधीत धोका होण्यास कारणीभूत ठरू शकतो. याव्यतिरिक्त, यामुळे लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलन प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो,” अशी चेतावणी बक्षी यांनी दिली.

How Much Rice & Roti You Should Eat In a Day
एका वेळच्या जेवणात भात व पोळ्यांचे आदर्श प्रमाण किती हवे? ताटात कुठल्या गोष्टी किती टक्के हव्यात? तज्ज्ञांनी दिलं सूत्र
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Three Key Rules To Loose 6 Percent Fats In a Month
६ टक्के बॉडी फॅट्स एका महिन्यात कमी करण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी पाळाच; वजन कमी करण्यासाठी झोप व आहाराचे नियम पाहा
Why Should you soak rice before cooking Does it help reduce blood sugar
भात करण्याआधी तांदूळ भिजवण्याचे फायदे वाचून व्हाल खुश; डॉक्टर सांगतायत, तांदूळ किती वेळ पाण्यात ठेवावा?
Incense Sticks Causing Cancer
घरी धूप, उदबत्ती लावताना १० वेळा विचार कराल, डॉक्टरांनी सांगितलेले हे परिणाम वाचा, मंदिरात झालेला अभ्यास काय सांगतो?
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
Heart-touching Letters to Son from father
Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा

हेही वाचा – “२०२४ निवडणुकीतील सर्वोत्कृष्ट फोटो!”आनंद महिंद्रांनी शेअर केली पोस्ट, नेटकऱ्यांना झाला आनंद

अल्कोहोलप्रमाणेच साखरेचीही मानवी शरीर चयापचय करते आणि आहारातील कर्बोदकांमध्ये फॅट्सचे रूपांतरण करते. कालांतराने, यामुळे फॅटी लिव्हर रोग होऊ शकतो, मधुमेह आणि हृदयविकाराचा संभाव्य धोका निर्माण करण्याचे कारण ठरू शकते. असे बक्षी यांनी सांगितले.

“अनेकदा स्वतःला आणि मुलांना गोड पदार्थ देऊन बक्षीस देतो, ज्यामुळे गोड पदार्थ आणि आनंद यांच्यात सकारात्मक संबंध निर्माण होतो. हे गोड पदार्थाच्या लालसेचे चक्र अधिक मजबूत करते, ज्यामुळे सवय मोडणे कठीण होते,” असेही बक्षी यांनी सांगितले. त्यामुळेच गोड पदार्थांचे सेवन करण्याची योग्य वेळ माहित असणे अधिक महत्त्वाचे ठरते.

सकाळी गोड पदार्थ खाऊ नका

बऱ्याच लोकांना तृणधान्ये किंवा पेस्ट्रीसारखा साखरयुक्त नाश्ता हवा असतो, ज्यामुळे जलद उर्जा वाढू शकते आणि मूड सुधारतो. मात्र, बक्षी यांनी याविरोधात सल्ला दिला आहे. “या शर्करायुक्त पर्यायांमध्ये साखरेचा प्रभाव संतुलित करण्यासाठी इतर पोषक तत्वांचा अभाव असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रात्रभर उपवास केल्यावर, आपले शरीर कार्बोहायड्रेट्ससाठी अधिक संवेदनशील होते, ज्यामुळे सकाळी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे आणखी वाईट गोष्ट ठरते.”

हेही वाचा – रोज सकाळी ब्रेड खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक?अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे का टाळावे?

दुपार गोड पदार्थ खाणे फायदेशीर

बक्षी यांनी सुचवले की, “जर तुम्हाला गोड खायचे असले तर दुपारच्या जेवणाच्या वेळी खा. या वेळेत आपली चयापचय क्रिया सामान्यतः अधिक सक्रिय असते, ज्यामुळे आम्हाला साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक सुसज्ज असते. याव्यतिरिक्त, वर्कआउट्सच्या आसपास साखरेचे सेवन केल्याने स्नायूंच्या पुनर्प्राप्तीस मदत होऊ शकते, तथापि, दैनंदिन साखरेच्या पातळीचे प्रमाण ओलांडू नये आणि निरोगी समतोल राखण्यासाठी माफक प्रमाणात सेवन करणे करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – एका वेळच्या जेवणात भात व पोळ्यांचे आदर्श प्रमाण किती हवे? ताटात कुठल्या गोष्टी किती टक्के हव्यात? तज्ज्ञांनी दिलं सूत्र

रात्रीच्या वेळी गोड खाणे टाळा

“रात्रीच्या जेवणानंतर शर्करायुक्त पदार्थांसाठी खाणे हे हानिकारक सेवन करण्यासारखे आहे. काहींसाठी, यामुळे फुगणे आणि गॅस सारख्या पचना संबधित समस्या उद्भवू शकतात. शिवाय, साखरयुक्त मिष्टान्न आतड्यांतील बॅक्टेरियाचे नाजूक संतुलन बिघडवू शकते. रात्री साखरेचे सेवन झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते. झोप हा शरीरातील उर्जा निर्माण करणे, निरोगी चयापचय आणि रोगप्रतिकारक कार्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

साखर किंवा गोड पदार्थ पूर्णपणे टाळू नये. काळजीपूर्वक वापर करणे महत्वाचे आहे. गोड पदार्थ कोणत्या वेळी खातो याचा शरीरावर काय परिणाम होतो हे लक्षात घ्या. माफक प्रमाणात सेवन केल्यास तुम्ही तुमच्या आरोग्याशी तडजोड न करता अधूनमधून गोड पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता.