राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रांतील धुरीण ‘आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का?’ या प्रश्नाचा सतत ऊहापोह करत आले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेची राजकीय मांडणी जोरकसपणे केली. ज्या पॉल सार्त् व सिमॉन द बुव्हा या पाश्चात्य विचारवंत जोडगोळीने मानवी अस्तित्वाला केंद्रस्थानी ठेवून मर्यादाविरहित स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. महात्मा गांधी व अरविंद घोष यांनी आध्यात्मिक स्पर्श असलेली स्वातंत्र्य संकल्पना साकारली. आणि त्यांची ज्या पूर्वसूरींशी नाळ जोडलेली होती त्या उपनिषद्कालीन ऋ षी, महावीर, बुद्ध यांनी ‘मुक्ती’ च्या परिभाषेत स्वातंत्र्याची व्याख्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोक्ष, मुक्ती याविषयी चर्चा सुरू झाली की तरुण पिढी त्यातून काढता पाय घेते. त्यांना हे सर्व कालबा व निर्थकही वाटते. या सर्वाचा विचार म्हातारपणी करावा, किंवा करूच नये, ‘लाइफ एन्जॉय करावं’ अशी त्यांची मनोधारणा असते. पण या गांभीर्याने घेण्याच्या गोष्टींबद्दलची तरुणाईची उदासीनता ‘स्वातंत्र्य’ संकल्पनेचे महत्त्व अधिकच अधोरेखित करते. ‘ब्लू व्हेल’सारख्या काल्पनिक खेळात गुंग होऊन आत्महत्या करणारी पौगंडावस्थेतील मुलं बघूनही त्यांना ‘स्वातंत्र्याबद्दल’ प्रश्न पडत नाहीत? की आपण स्वतंत्र आहोतच अशी त्यांची खात्री आहे?

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr minal katarnikar special article on independence day
First published on: 11-08-2017 at 21:44 IST