विचार हे वाईनसारखे असतात. ते जितके जुने होत जातात तितके अधिक किमती आणि मौल्यवान होत जातात, असे मीच मागे एकदा प्रचंड मोठय़ा जाहीर सभेत जनसमुदायाबरोबर कोपऱ्यात बसलेलो असताना मनातल्या मनात म्हणालो होतो. मी दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो आणि वाचाळही असतो तर माझ्या विचारांना आज फार महत्त्व आले असते. मी सध्याच्या काळात जन्माला आलो याची मला खूप रुखरुख आहे आणि त्यामुळे माझ्या विचारांना कोणीच सध्या महत्त्वाचे मानत नाही याची खंतही आहे. तर ते असो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच एका जुन्या माणसाने म्हणून ठेवले आहे की, प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते. हे मांडणारा माणूस जुना असला तरी मी त्याच्या मताशी सहमत नाही. माझ्या मते, आपल्या देशाच्या बाबतीत हे विधान अगदीच खोटे आहे. आपल्या देशातील जनतेला नेहमीच तिच्या लायकीपेक्षा जास्त चांगले सरकार मिळत आलेले आहे. आपले नागरिक जितके बोगस आहेत, तितके जर आपले लोकप्रतिनिधीही बोगस असते तर काय झाले असते, याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. मी असे वाचले आहे की, कोणत्यातरी देशाचा राष्ट्रप्रमुख हा जेवणात तोच तोपणा यायला लागला की मधून मधून मेजवानी म्हणून माणूस खायचा. आपण इतके भाग्यशाली आहोत, की आपल्या एकाही राष्ट्रप्रमुखाला कधीही चवबदल करावासा वाटला नाही. आपल्या राष्ट्रप्रमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, कामचुकारपणाचे किंवा अरेरावीचे आरोप झाले; पण माणूस खाण्याचे मात्र आजवर कधीही आरोप झालेले नाहीत. आता हे भाग्य आपल्याच वाटय़ाला का यावे? की आपण बेचव नागरिक आहोत? – हा एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author mandar bharde article on typical mentality of indian people
First published on: 04-06-2017 at 01:35 IST