काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या आमदारांचे पगार वाढले. पगार वाढल्या वाढल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या सवयीनुसार त्यावर सडकून टीका केली. वर्तमानपत्रांकडे वाचकांच्या पत्रांचा खच येऊन पडला. चॅनेलवर लोकांनी तावातावाने या पगारवाढीचा निषेध केला. आमदारांच्या पगारवाढीला कोणताही सुजाण नागरिक कसा काय विरोध करू शकतो, तेच मला समजत नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही इतर व्यावसायिकापेक्षा आमदारांना जास्त पगार असला पाहिजे, हे माझे ठाम मत आहे. ज्या खडतर परिस्थितीत आमदाराला आपले कर्तव्य बजावावे लागते ते पाहता आज त्यांना जो पगार मिळतो आहे तो अगदीच तुटपुंजा आहे असे माझे ठाम मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अत्यंत असुरक्षित वातावरणात आमदारांना आपले कर्तव्य बजावावे लागते. जगातल्या सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये एक किमान हमी, एक किमान सुरक्षितता असते. आपली नोकरी कधी आणि कशामुळे जाईल याची कोणतीही खात्री आमदारांना नसते. घरातला कोणीतरी जवळचा विरोधात उभा राहिला, नेत्याने त्याच्या जवळच्याला तिकीट दिले, युतीत घटक पक्षाला मतदारसंघ सुटला, आरक्षण बदलले, मतदारसंघाची रचना बदलली, हायकमांडचे मन बदलले, किंवा एबी फॉर्म घेऊन येणारा गायब झाला.. अशा कोणत्याही अतक्र्य कारणाने एखाद्याची आमदारकी धोक्यात येऊ  शकते. बरं, कोणत्या कारणाने तिकीट मिळेल याचे कोणतेही पक्के निकष नाहीत. कधी एखाद्याला ‘तुम्ही अगदी नवीन आहात, थोडे काम करा आणि मग तिकीट मागा..’ म्हणून तिकीट नाकारतात. तर एखाद्याला ‘तुम्ही फार र्वष काम केलेत!’ म्हणून तिकीट नाकारतात. एखाद्याला ‘तुमच्यावर खूप आरोप आहेत’ म्हणून तिकीट नाकारतात. तर दुसऱ्याला त्याच्यावर कितीही आरोप असले तरी निवडून येण्याची क्षमता आहे म्हणून तिकीट देतात. आता इतक्या असुरक्षित वातावरणात काम करणाऱ्यांचा पगार थोडा वाढवला, तर तक्रार करायचे काय कारण आहे?

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandar bharde article on mlas salaries marathi article
First published on: 30-04-2017 at 01:56 IST