सांगली, कोल्हापूर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बालेकिल्ले असून, जास्तीतजास्त जागा पदरात पडाव्यात यासाठी आपण आग्रही असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शिराळय़ातून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक हेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
 शेट्टी म्हणाले, की महायुतीच्या केंद्रीय कार्यकारिणीचा मी सदस्य असून जागावाटप निश्चित करण्यासाठी लवकरच बठक घेण्यात येणार आहे. लोकसभेसाठी आम्ही चार जागा मागितल्या होत्या. त्यापकी दोन मिळाल्या. विधानसभेसाठी किती जागांची मागणी करायची याबाबत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बठकीत निर्णय घेतला जाईल.
विधानसभेसाठी वाळव्याची जागा मागितली जाणार असलीतरी या ठिकाणाहून सदाभाऊ खोतच उमेदवार असतील असे नाही. त्यांच्यासाठी शाहूवाडी व सांगोल्यातून उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांकडून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.