पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जदेखील केला.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हानच दिलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतकी हिंमत दाखवत असतील तर त्यांचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात हे आम्ही पाहू. जागोजागी त्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमात हाती घेऊ. मग चपला मोजण्याचं काम त्यांनी करावं”.

pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Praniti Shinde, solapur
भाजप समर्थकांकडून चारित्र्यहनन होण्याची प्रणिती शिंदे यांना भीती
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके
Bacchu Kadu and Navneet Rana
बच्चू कडू आक्रमक! “नवनीत राणांना पाडणार, स्वाभिमानाचा गुलाल उधळणार, भाजपाने…”

VIDEO : पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल

“आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने विरोध करत असतील तर भाजपाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. हिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग चप्पल कुठे कुठे घालायला लावतो पाहा,” असं जाहीर आव्हानही नितेश राणेंनी यावेळी दिलं.

नेमकं काय झालं?

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या भीती दाखवून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गर्दीमधून फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. मात्र चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलं नाही. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.

फडणवीसांची प्रतिक्रिया –

दरम्यान कार्यक्रमस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, “स्वत: काही करायचं नाही. आपल्या कार्यकाळात ते काहीच करु शकले नाहीत आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौर, पदाधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम करुन दाखवलं याबद्दल त्यांच्या मनात असुया आहे. ही असुया या कार्यक्रमातून दिसते. पण मला एका गोष्टीचं अतिशय दु:ख आहे ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी ज्या अण्णाबासाहेब पाटलांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि जीव दिला त्यांच्या पुतळ्याच्या उद्धाघटनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं काम होत असेल किंवा अटलजींना विरोध होत असेल तर यांची बुद्धी तपासून पाहिली पाहिजे”.

यावेळी त्यांना गाडीवर चप्पल भिरकावण्यासंबंधी विचारलं असता त्यांनी मला माहिती नाही, कोणीतरी फालतू लोक असतील असा टोला त्यांनी लगावला.