scorecardresearch

“महाराष्ट्रातल्या नागरिकांची स्वप्नं साकार कर, सगळी विघ्नं दूर होऊ दे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गणरायाला साकडं

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

CM eknath Shinde
मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाची पूजा

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच विघ्नहर्ता राज्यात पाऊस पाडेल आणि आनंदाची बरसात करेल अशी मला अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची स्वप्नं साकार करण्यासाठी मी गणरायाला साकडं घातलं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

गोरगरीब जनता, पोलिसांसाठी घरं, गिरणी कामगारांच्या घरांसाठी लॉटरी असे अनेक चांगले निर्णय आम्ही लोकांसाठी घेतले आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यापैकी एकाही शेतकऱ्याला आम्ही सरकार म्हणून वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही नियम मोडून मदत केली आहे. १ रुपयात शेतकऱ्याला पिकवीमा मिळतो आहे. आम्ही बळीराजाच्या पाठिशी ठामपणे हे सरकार उभं आहे असंही यावेळी एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
us intelligence agencies given evidence to canada of hardeep singh nijjar murder
निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच; अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे वृत्त 

आज गणपतीचं आगमन झालं आहे. मी सगळ्यांना मनापासून आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग सगळीकडे गणरायाचं आगमन झालं आहे. आजचा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातल्या आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेवरचं, शेतकऱ्यावरचं, गोरगरीब जनतेवरचं अरिष्ट दूर होऊ दे असं साकडं मी आज देवाला घातलं आहे. आमच्या प्रयत्नांना विघ्नहर्ता बळ देईल असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मागच्यावर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा झाला. यावर्षीही मी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जी मंडळं वर्षानुवर्षे शिस्तीने आणि नियमाने गणपती बसवतात त्यांना सरसकट पाच वर्षांची संमती द्यावी. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले कारण लोक एकत्र आले पाहिजेत आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. आपण आजही तो उत्सव साजरा करतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 16:49 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×