महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यास तयार होते आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठकही झाली होती, असा दावा सध्या महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाबरोबर जाण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. ही बाब खरी आहे, असे ते म्हणाले. एपीबी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली, हे सर्वांना माहिती आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपाबरोबर जाण्याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीचा तपशील मी आता सांगणार नाही. मात्र, ही बैठक झाली, हे खरं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी आधी भाजपा आणि महायुतीला फसवलं, महाराष्ट्रातील जनतेला फसवलं, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि दुसऱ्यांना महाविकास आघाडीलाही फसवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
sudhir mungantiwar reacts on supriya sules statement about democracy
सुप्रिया सुळेंना मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले “माविआ सरकार होतं तेव्हा..”
Parambir Singh and Eknath Shinde
Eknath Shinde : “मविआच्या काळात एकनाथ शिंदेंनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला”, परमबीर सिंग यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यांच्या मंत्रिमंडळातील…”
dhav Thackeray, Thane, MNS, Uddhav Thackeray s Convoy Attacked by MNS , convoy attack, Shiv Sena, Rajan Vichare, Kedar Dighe, political clash, thane news,
मर्द असता तर समोर आले असते, हल्ला करून पळून का गेले? ठाकरे गटाचे राजन विचारे यांची मनसेवर टीका
Devendra Fadnavis on Budget 2024
“मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला, पण…”; परमबीर सिंह यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हेही वाचा – राज ठाकरेंबरोबर युती करताना नातं आडवं येतं का? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले……

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली. भाजपा आणि महाविकास आघाडी या दोघांनाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. कारण त्यांना खुर्चीचा मोह सुटत नव्हता. त्यांनी विरोधातील १२ आमदारांना निलंबित केले. याशिवाय भाजपाच्या काही आमदारांना तुरुंगात टाकण्याचा आणि भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होतं, असे ते म्हणाले.

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी काय म्हटलं होतं?

दरम्यान, उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. लोकसत्ताच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत भाष्य केलं होतं. “महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली होती. ते चर्चेसाठी वेगळे बसले होते. याबाबत त्यांचे काही लोक जे आता रोज सकाळी बोलण्यासाठी येतात (संजय राऊत) ते नाकरतील. मात्र, काही लोकांनी हे सांगितलं होतं की, उद्धव टाकरे हे पाऊल (भाजपा बरोबर जाण्याचं) उचलणार होते”, असं ते म्हणाले होते.

याशिवाय एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे यांनीही अशाच प्रकारचा दावा केला होता. २०२१ मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक होते असं तटकरेंनी सांगितलं होतं.