मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरू झालेल्या कोको-कोला कंपनीच्या प्रकल्पाचं स्वागत केलं. तसेच कोका-कोला कंपनीची २०१५ मध्ये येथे येण्याची इच्छा होती, असं नमूद केलं. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अमेरिका दौऱ्याचाही उल्लेख केला. यावेळी शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका करत ठाकरे गटाला लक्ष्य केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “कोका-कोला कंपनीचे देशभरात विविध ६० उत्पादनं आहेत. तेथे आज हजारो कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीने २०२३ मध्ये भारतात एकूण १२ हजार ८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कोका-कोलासारखी कंपनी रत्नागिरीत उभी राहत आहे. त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होईल. सरकारची स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका आहे. व्यवस्थापनानेही या कंपनीत स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.”

Aarey - BKC Underground Metro Inauguration,
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Eknath Shinde, metro project, Eknath Shinde on metro,
चौकशी लावली असती तर मेट्रो प्रकल्प सुरू झाला नसता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
Raj Thackeray slams mantralaya net protest
Raj Thackeray: “जाळ्या नसलेल्या इमारतीतून उड्या मारा”; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shivsena-BJP Pimpri, flood line Pimpri,
पिंपरी : शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी विरोध करताच प्रशासनाचे एक पाऊल मागे; पूररेषेतील बांधकामांना अभय
vijay wadettivar
Vijay Wadettiwar : “…मग ब्रिजभूषण सिंह यांचे एन्काऊंटर का केले नाही?”; अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचं पुन्हा शिंदे सरकारवर टीकास्र!

“फडणवीसांच्या अमेरिका दौऱ्यात ठरलंही होतं, परंतु…”

“कोका-कोला कंपनीची २०१५ मध्ये येथे येण्याची इच्छा होती. त्यावेळी आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका दौऱ्यात असताना याबाबत ठरलंही होतं. परंतु नंतर नवीन सरकार आलं. त्या सरकारबद्दल मी काही सांगत नाही. सरकार बदलल्यावर काय काय अडचणी येतात आणि त्याचं कारण काय यावर मी बोलणार नाही,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

“फक्त राजकारणासाठी कोकणी माणसाला वापरण्याचं काम आम्ही करणार नाही”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “खरं म्हणजे या कोकणात जेवढं काम करता येईल तेवढं केलं पाहिजे होतं. कारण कोकणाने नेहमीच बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं आहे. आमच्या सगळ्यांवर प्रेम केलं आहे. फक्त राजकारणासाठी कोकणी माणसाला वापरून घेण्याचं काम आम्ही करणार नाही, कधीही आमचं सरकार करणार नाही.”

हेही वाचा : खालच्या भाषेतील टीका किती काळ सहन करणार? एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“बाळासाहेब ठाकरेंनी आणि आनंद दिघेंनी ते कधी शिकवलं नाही”

“इथल्या भूमीपुत्रांना मोठमोठी स्वप्ने दाखवायची, कौतुक करायचं आणि एखादा चांगला प्रकल्प आला की, त्याला विरोध करायला लावायचा, असं राजकारण आम्ही कधीही केलं नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आणि आनंद दिघेंनी ते कधी शिकवलं नाही. मात्र, ज्यांनी हे केलं त्यांच्यामुळे हा प्रकल्प इतक्या उशिरा येथे सुरू होत आहे. आपलं सरकार आल्यावर तात्काळ जे जे उद्योग महाराष्ट्रात येऊ इच्छितात त्यांना आम्ही रेड कार्पेटचे आदेश दिले,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.