नांदेड : नवरात्रोत्सवाचा जागर शहर व जिल्हाभर सुरू असतानाच मागील तीन दिवसांपासून नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांना पावसाचा आणखी एक तडाखा बसला आहे. बुधवारी पावसासोबतच ठिकठिकाणी विजा कोसळल्यामुळे धर्माबादमध्ये एक विद्यार्थिनी मरण पावली. दुसरया एका दुर्घटनेत एक तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला.

धर्माबाद येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी स्वाती कामाजी आवरे (वय १५) ही विद्यार्थिनी संस्थेतून आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकाकडे येत असताना अंगावर वीज कोसळून मरण पावली. त्याआधी नायगाव तालुक्यातील केदार वडगाव येथे एका माळरानावर प्रदीप दशरथ गायकवाड हा शेतकरी वीज पडून जखमी झाला. याच दुर्घटनेत एक गायही मृत्युमुखी पडली. नायगाव तालुक्यातील धानोरा येथे खंडोबा मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने कळस कोसळला, पण या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

बुधवारी दुपारी नांदेड शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर सायंकाळी पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आधी जोरदार पाऊस झाला होता. तेव्हापासून हे सत्र कायम आहे. गुरुवारी वरुणराजाने दिवसभर विश्रांती घेतली होती. दुसरा अपघात वाळूज परिसरात घडला असून यामध्ये ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगला विठ्ठल शहाणे (वय ६२) या मृत महिलेचे नाव असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले. मंगला शहाणे या पहाटे वाळूज परिसरातील पंढरजवळून पायी जात असताना त्यांना एका ट्रकने उडवले. त्यांनाही घाटीमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी मृत घोषित केले.