औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी राज्य सरकारला पाठवलं. यानंतर दोन्ही शहरांच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने शहरांनी नावे बदलण्याची अधिसूचना जारी केल्यापासून ही दोन्ही शहरे नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. मात्र, या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे.

एमआयएमच्या राष्ट्रीय मेळाव्यात बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, “इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. काहीजण औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार,” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
nashik lok sabh seat, Shiv Sena, Ajay Boraste, Emerges as Potential Contender, Amidst maha yuti Conflict, ajay boraste visits thane, ajay boraste, eknath shinde shivsena, bjp
नाशिकच्या जागेचा तिढा अन् अजय बोरस्ते यांची ठाणेवारी
Four persons arrested in Mahabaleshwar for hunting Pisori deer
महाबळेश्‍वरमध्ये पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी चार जण ताब्यात
Murder in Kolhapur 8 Suspects accused jailed within 24 hours
कोल्हापुरात खून; संशयित ८ आरोपी २४ तासात जेरबंद

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा शिवसेनेतून बाहेर जात होता, म्हणून…”, गुलाबराव पाटलांचं गद्दारीबाबत विधान

“नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का?”

तर, एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही नामांतरला विरोध कायम राहणार असल्याचं सांगितलं. “स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात न घेताच परस्पर हे नामांतर करण्यात आलं आहे. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का? किंवा शहरातील नागरिकांना दोन वेळ पुरेसे पाणी मिळणार आहे का,” असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.