गणपती बसल्यापासून संसदेचं अधिवेशन सुरु होतं. त्यानंतर मी बारामती लोकसभा मतदार संघात आले आणि विविध ठिकाणी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. मी गणपतीकडे दरवर्षी एकच साकडं घालते की महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणी आलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळू दे असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडण्यात वेळ घालवला नसता तर

देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवली गेली, या कृतीचं मी समर्थन करणार नाही. ते माझे राजकीय विरोधक आहेत मात्र तरीही जेव्हा ते तुम्हाला भेटायला येत आहेत तेव्हा अशा गोष्टी होणं योग्य नाही. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नागपूरची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत केली पाहिजे. असं असलं तरीही भाजपाचं नेतृत्व पक्ष फोडणं, घरं फोडणं त्यासाठी इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यांचा वापर करण्यात इतके मग्न असतात की त्यांना बदल करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी वेळ नसतो हे त्यांच्या कृतीतून दिसतं.

BJP, Sangli, minorities, Sangli latest news,
सांगली : भाजपकडून अल्पसंख्यांकांना विश्वास देण्याचे काम
Sharad Pawar, Chopda,
केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर, चोपड्यातील सभेत शरद पवार यांची टीका
Union Home Minister Amit Shah on Saturday asserted that only Prime Minister Narendra Modi government has the courage to stop infiltrators in the country
आरक्षण रद्द करण्याच्या कथित व्हिडिओवर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर आरोप करत म्हणाले…
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश

जालन्यात जेव्हा महाराष्ट्रातल्या सुना, लेकी आणि मुलांवर हल्ला झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले होते. नागपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्यात मी हे म्हणेन त्यांची गाडी अडवणं योग्य नाही कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्याचवेळी मी हे म्हणेन की देवेंद्र फडणवीस यांनी सगळा जो वेळ त्यांच्याकडे घरं फोडणं आणि पक्ष फोडण्याकडे दिला नसता आणि विकासाला वेळ दिला असता तर ही वेळ आली नसती असाही टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

देशात आणि महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न

दुष्काळ, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न राज्यात आणि देशात आहेत. देशाच्या सुरक्षितेतचा विषय महत्वाचा आहे. कॅनडाने भारतावर मोठा आरोप केला आहे. तसंच काश्मीरचा प्रश्न आहेच. शिवाय मणिपूरचा प्रश्नही सुटलेला नाही. मायबाप जनता बेरोजगारीची झळ सोसते आहे. अशात भाजपाकडून कट कारस्थान सुरु आहे त्याचं मला आश्चर्यही वाटणं बंद झालं आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. संसदेत विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं त्यात बेरोजगारी, महागाई वगैरे कशावरही चर्चा झाली नाही. महिला विधेयकाचा जुमला फक्त दिसला. महिला खासदार जेव्हा बोलू लागल्या तेव्हा भाजपाचे नेते गोंधळ घालत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं की नव्या इमारतीत आपण जुनी कटुता मागे ठेवू. त्यामुळे आम्ही मोदींचं कौतुक केलं होतं. चांगल्या गोष्टी संसदेत होणार असतील, संसदेचा सन्मान राखणार असतील तर आम्ही साथ देणार हे मान्य केलं होतं. मात्र पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा खासदाराने महिलांचा अपमान केला असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला.