पुणे : राज्यातील कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ९७.४२ टक्के रास्त आणि किफायतशीर दर अर्थात ‘एफआरपी’ देण्यात आली आहे. साखर निर्यातबंदी आणि इथेनॉल उत्पादनावर निर्बंध असल्याने साखर कारखाने अडचणीत होते. तरीही एफआरपी देण्यात मात्र राज्यातील कारखान्यांनी हात आखडता घेतलेला नाही.

हेही वाचा >>> वर्धा, अमरावतीला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; विदर्भात गारपीट होण्याचे कारण काय?

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Will Maharashtra maintain Gujarat sugarcane price Question of Sharad Joshi Farmers Association
गुजरातचा ऊसदर महाराष्ट्राला पेलणार का? शरद जोशी शेतकरी संघटनेचा प्रश्न, यंदाही दरात गुजरातचा गणदेवी सर्वोच्च
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, “बारामतीत जिंकणार तर…”
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
ajit pawar nilesh lanke latest news
Video: “धन्यवाद दादा, तुम्ही…”, अजित पवारांचा Video पोस्ट करत निलेश लंकेंचा टोला; म्हणाले, “खरं प्रेम कधीही…”

यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील एकूण २०७ कारखान्यांनी सुमारे १०७२.१७ लाख टनांचे गाळप केले आहे. त्यापोटी एकूण देय ‘एफआरपी’ची रक्कम ३३,१९८ कोटी रुपयांवर गेली होती. त्यापैकी एप्रिलअखेर ३२,३४० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली. अद्याप कारखान्यांकडे ८५८ कोटी रुपये एफआरपी थकीत असली, तरीही दिलेली एफआरपी तब्बल ९७.४२ टक्के इतकी आहे.

हेही वाचा >>> पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ज्येष्ठावर तलवारीचे वार

गाळप हंगाम अद्याप सुरू आहे. राज्य सरकारनेही गाळप हंगाम बंद झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही. त्यामुळे गाळप हंगाम बंद होताच उर्वरित आणि अंतिम ‘एफआरपी’ही दिली जाईल, असे वेस्ट इंडियन शुगर मिल्सचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. साखरेचे विक्री मूल्य वाढले यंदा निर्यातबंदी आणि इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे साखर कारखाने अडचणीत आले होते. पण, गेल्या दोन महिन्यांत साखरेचे विक्री दर ३३०० रुपये प्रति क्विंटलवरून ३६०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे कारखान्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देणे शक्य झाले, अशी माहिती विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.