Maharashtra Political Crisis News : शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष रविवारी नव्या वळणावर पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्यावर त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीनपैकी एक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली आहे. तरी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या उपलब्ध चिन्हांच्या यादीतच या तिन्ही चिन्हांचा समावेश नाही. परंतु यादीत उपलब्ध असलेली चिन्हे ही शिवसेनेचा विचारसरणी, ध्येयधोरणांशी सुसंगत नसल्यानेच अपवाद म्हणून तीनपैकी त्रिशूळ चिन्ह मिळावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तर मराठी अस्मिता, हिंदूत्व जपणाऱ्या शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवून काय मिळवले असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिंदे गटासह भाजपला लक्ष्य केले. २०१९ साली भाजपाबरोबर युतीमध्ये लढलात, त्यानंतर खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली. मग कट्यार कुणी काळजात घुसवली?” असा उलट सवाल म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. अशा राज्यातील राजकीय तसंच विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर वाचता येईल…