‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करताना ठाण्यातील एका मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ७२ तासांतच जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोणत्याही परिस्थितील मला अटक होईल, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. पण, ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटतं,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

in Yavatmal-Washim Constituency Uddhav Thackerays candidates will lose Due to the election symbol
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…
Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
Bhaskar Bhagre and Bharti Pawar
दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात

हेही वाचा : “‘अमृत काळ’चे वेष्टण लावून…”, अर्थसंकल्पावरून अजित पवारांचं मोदी सरकारवर टीकास्त्र!

“राज्यावर सध्या सहा लाख ६६ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. ते दर दिवशी वाढत आहे. अशाच पद्धतीने राज्य चालले, तर महाराष्ट्र दिवाळीखोर होईल. केंद्र सरकारने जे मोफत धान्य आणि मोफत रेशन दिलं आहे. पण, मोफत देऊ काही होत नाही. तुम्ही त्या हातांना काम द्या. जे काम त्यांना रेशन घरात घेऊन जाऊ शकते. मोफत देता तो पैसा तुम्ही घरून आणता का,” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केंद्र सरकारला विचारला आहे.