शिवसेनेत बंडखोरी होण्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. भाजपाने बंडखोर एकनाथ शिंदे गटाबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर तर हा आरोप वारंवार केला. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला एकनाथ शिंददेखील नको आहेत, असं मोठं विधान केलं. तसेच भाजपाला एकनाथ शिंदेंचं ओझंही उतरवायचं आहे, असं म्हटलं. ते शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहेत. त्यांना जसे उद्धव ठाकरे नको होते, तसेच एकनाथ शिंदेही नको आहेत. हे ओझंही त्यांना उतरवायचं आहे. त्यांना परिस्थिती त्यांच्या बाजूने दिसली तर ते निवडणुका घेणं पसंत करतील.”

Dravid and Agarkar paying their respects to the father of the Indian constitution
राहुल द्रविड, अजित आगरकर यांची बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेत आदरांजली
anup dhotre, akola lok sabha constituency, lok sabha election 2024, BJP
Akola Lok Sabha Election Result 2024 : अकोल्यात सलग पाचव्यांदा कमळ फुलले; अनुप धोत्रे यांचा ४० हजार ६२६ मतांनी विजय
manusmriti verses not proposed in news syllabus says dcm devendra fadnavis
अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा प्रस्ताव नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Ajit Pawar group demands Chief Minister Eknath Shinde to file a criminal case and arrest him for insulting Dr Babasaheb Ambedkar
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणार्‍या आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा; अजित पवार गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
jitendra awhad
मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याचा भाजपाचा आरोप; आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका!
Modi converted Lok Sabha elections into Gram Panchayat
मोदींनी लोकसभा निवडणुकीचे ग्रामपंचायत निवडणुकीत रुपांतर केले अन् लक्ष्मणरेषा पार केली : प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar reaction that BJP does not want nationalism anymore
भाजपला आता रास्वसं नकोसे – प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
prakash ambedkar
“नरेंद्र मोदी हे ‘मौत का सौदागर’, त्यांनी करोना काळात…”; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्र!

“आत्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाची आणि भाजपाची युती होते का हे पाहावं लागेल,” असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.

अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.”

“सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर…”

“शिवसेनेच्या कोणत्याही गटाबाबत सकारात्मक नाही. मात्र, व्यवस्थेचा विचार केला, तर माझ्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने जे चुकीचं सुरू होतं त्याबाबत मी माझी भूमिका मांडली. त्यात मी कायद्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर काय होऊ शकतं याची सर्वोच्च न्यायालयानेच मांडलेली जंत्री मी लोकांसमोर मांडली,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

“सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “दुसरं एखाद्या मुख्यमंत्र्याने कायदेशीर पेचप्रसंग तयार झाल्याने राजीनामा दिला, तर पुन्हा सरकार स्थापनेबाबतचा अधिकार राज्यपालांना आहे का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने त्या काळातील संकेत महत्त्वाचे आहेत. ते संकेत सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही भूमिका घेतोय की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे.”

हेही वाचा : VIDEO: “आम्ही दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला, पण…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

“मला असं दिसत होतं की अनेकजण हे मानायलाच तयार नव्हते. सभापतींनी १६ जणांच्या निलंबनावरील स्थगिती उठवली की नाही याचा कोठेही खुलासा होत नाही, अशी स्थिती आहे,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं.