काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे आज (१२ मार्च ) महाराष्ट्रात आगमन झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यासाठी काँग्रेस पक्षाकडून मोठी तयारी करण्यात आली होती. भारत जोडो न्याय यात्रा १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च ठाणे आणि १६ मार्चला मुंबईत पोहोचणार आहे. तर १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्क मैदानावर होणार असून यावेळी महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडणार आहे.

या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेत भारत जोडो न्याय यात्रेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली. “भाजपाने कितीही लोकांचे घर फोडले, तरी त्यांचे घर रिकामेच राहील. मोदींची सुसाट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार…”, असे प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिले.

Advocate Ujjwal Nikam
मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर, पूनम महाजन यांचा पत्ता कट
sanjay raut narendra modi
“…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”

विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?

“भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरमधून झाली. जवळपास १५ राज्ये आणि १०० जिल्ह्यांमधून या यात्रेने प्रवास केला आहे. आता ही यात्रा नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात येत आहे. १५ राज्ये आणि १०० जिल्ह्यांचा प्रवास करताना राहुल गांधी यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. १७ तारखेला इंडिया आघाडीची मुंबईत भव्य रॅली आणि ऐतिहासीक सभा होणार आहे”.

हेही वाचा : मोठी बातमी! वसंत मोरेंचा मनसे आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र, मध्यरात्री केली होती ‘ती’ पोस्ट

“या सभेच्या माध्यमातून खोटारड्या केंद्र सरकारला ‘चले जाव’चा नारा दिला जाणार आहे. मोदी सरकार देशाला उध्वस्त करण्याचे काम करत आहे. देशातील जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. मतदानातून या सरकारला घरी कसे पाठवता येईल? याची सर्वजण वाट पाहत आहेत. सीबीआय, ईडीचा वापर करून भितीचे वातावरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. विरोधी पक्षाचे नेते पळवायचे, पक्ष फोडायचे, अशा प्रकारचे यांचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडले, तरीदेखील भाजपाला म्हणावे तेवढे यश मिळण्याची शक्यता नाही. भाजपात सध्या एवढी अस्वस्थता आहे, त्यांना महायुतीचे उमेदवार घोषीत करताना नाकीनऊ येत आहेत. पण तुम्ही कितीही लोकांचे घर फोडले तरी तुमचे घर रिकामेच राहणार आहे”, अशा शब्दात वडेट्टीवारांनी भाजपाला सुनावले.

“सुसाट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार…”

“महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत लवकरच मार्ग निघेल. पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मोदींची गाडी सुस्साट चालली आहे’, आता सुस्साट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार आहे, म्हणजे सुस्साट चाललेल्या गाडीवर कंट्रोल नसतो ना? आमची गाडी हळूहळू चालते, त्यामुळे गाडीही नियंत्रणात राहील आणि गाडीतून जाणारे-येणारे देखील सुरक्षित राहतील”, असे वडेट्टीवार म्हणाले.