विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात एरव्ही सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याची चिंता असते. परंतु यंदा अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, त्यामुळे बदलेली राजकीय समीकरणं, विधान परिषदेत विरोधकांचं घटलेलं संख्याबळ यामुळे उद्यापसून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिनधास्त आहेत. याउलट आपले अस्तित्व दाखवून सरकारची कोंडी करण्याचं मोठं आव्हान विरोधकांपुढे असेल. आगामी अधिवेशनातून राज्यातील जनतेला काय मिळेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

राज ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. चिपळूण, दापोली येथे ते महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे मेळावे घेत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. काही वेळापूर्वी राज ठाकरे एका बैठकीसाठी जात असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना थांबवून काही प्रश्न विचारले. परंतु राज ठाकरे यांनी फार बोलणं टाळलं. ते म्हणाले, राज्यात कुठल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे? त्यांना (सत्ताधारी – विरोधक) जर असं वाटत असेल हे राजकारण आहे तर भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल? आपण सगळेजण याचा साधा विचार तरी करतोय का? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ सत्तेचं आणि स्वार्थाचं राजकारण सुरू आहे, हे फार घाणेरडं आहे.

Former Minister of State for Finance Dr Sunil Deshmukhs question on the provision for Maharashtra in the budget
“मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र आहे का…?”, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा सवाल
Girish Mahajan Ajit Pawar
Girish Mahajan : कॅबिनेट बैठकीत अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये निधीवरून खडाजंगी? महाजन म्हणाले, “मी माझ्या खात्यासाठी…
guardian minister uday samant statement on mla bharat gogawale after press reporter question
भरत गोगावले हेच रायगडचे अदृश्य पालकमंत्री; पालकमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
Eknath Shinde on Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रात लाडका भाऊ योजनाही अस्तित्वात? मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देताना विधानसभेत म्हणाले…
sanjay shirsat on bachchu kadu third fornt
विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीचे बच्चू कडूंचे संकेत? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी तुमची…”
Nana Patole Criticizes mahayuti Government over Ladki Bahin Yojana, Congress, Nana Patole, Congress State President Nana Patole, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024, Election Gimmick, marathi news,
“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल महायुती सरकारमध्ये…,” नाना पटोलेंची टीका
ambadas danve
“विधान परिषदेत खेळाडूंऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव”, अंबादास दानवेंचा आरोप; म्हणाले, “आम्हाला…”
Apprenticeship scheme in the Congress manifesto in the Mahayuti budget nagpur
काँग्रेस जाहिरनाम्यातील ‘अप्रेंटिसशिप’ योजना महायुतीच्या अर्थसंकल्पात

यावेळी राज ठाकरे यांना ठाकरे यांना विचारण्यात आलं की, आगामी विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? यावर राज ठाकरे यांनी केवळ ‘घंटा’ असं म्हणत ते तिथून निघून गेले.

हे ही वाचा >> “पक्षात आत्ता दोन गट, परंतु भविष्यात…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य चर्चेत

रत्नागिरीतल्या दापोली येथे काल (शनिवारी) राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की, सध्या जे काही राजकारण राज्यात सुरु आहे ते भयंकर आहे. पुढे बघा आणखी किती ते गलिच्छ होतंय. हम करे सो कायदा अशी राज्यातली स्थिती आहे. अजूनही निवडणुका लागत नाही. कुणीही यावर काही बोलत नाही. मोबाइल फोन, सोशल मीडिया नावाचं जे माध्यम आलं आहे त्यावर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. पूर्वी लोक रस्त्यावर उतरायचे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचे. आत्ता असं काही घडत नाही. मोबाईलवर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. लोक जोवर रस्त्यावर उतरत नाहीत तोवर हे राजकारण वठणीवर येणार नाहीत.