मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. हा वाद इतका टोकाला गेला की आमदार गायकवाडांनी एकदा बोलता बोलता राऊतांना शिवीगाळही केली. आता पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे. ते रविवारी (४ डिसेंबर) बुलढाण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

संजय गायकवाड म्हणाले, “संजय राऊत फाटक्या तोंडाचे आहेत. हिंदू धर्मात जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा पाचव्या दिवशी बाळाच्या तोंडात गोड मधाचं बोट फिरवलं जातं. हे लेकरू आयुष्यभर गोड बोलावं असा त्यामागे हेतू असतो.”

thane lok sabha marathi news, naresh mhaske marathi news
नरेश म्हस्केंच्या मिरवणुकीकडे गणेश नाईक समर्थकांची पाठ
vaishali darekar kalyan lok sabha marathi news
कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या प्रचार दौऱ्याकडे ज्येष्ठ शिवसैनिकांची पाठ
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

“…म्हणून संजय राऊतांची जीभ सारखी फडफड करते”

“मला वाटतं संजय राऊत यांच्या मातोश्री नेमकं हे विसरल्या. त्यामुळे संजय राऊतांची जीभ सारखी फडफड करते आणि ते बेताल वक्तव्य करत असतात,” असं म्हणत गायकवाडांनी राऊतांना टोला लगावला.

व्हिडीओ पाहा :

शिवीगाळ करत संजय गायकवाड काय म्हणाले होते?

संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर निशाणा साधला होता. “चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. त्यांनी राऊतांना थेट शिवी दिली.

हेही वाचा : VIDEO: शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू…” असं गायकवाड म्हणाले होते.