मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी औषधोपचार घेणंही बंद केलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावू लागली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे यांच्या या उपोषणामुळे राज्य सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी सोमवारी (११ सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अद्याप त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला विरोधक राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आज (१२ सप्टेंबर) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाची मागणी केली.

खासदार संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय घेतला पाहिजे. यासाठी घटनेत तरतूद करावी, तसेच घटनादुरुस्ती केली पाहिजे. आरक्षणाविषयी सर्वसमावेशक असा तोडगा काढणं गरजेचं आहे. एवढचं आमचं म्हणणं आहे.

Chhagan Bhujbal , Nar-Par ,
Chhagan Bhujbal : नार-पारविषयी माझी भूमिका हा योग्य पर्याय – छगन भुजबळ यांचा दावा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
ed officer extortion sanjay raut
ईडी अधिकारी व्यावसायिकाच्या माध्यमातून खंडणी उकळत असल्याचा आरोप, प्रकरण बंद करण्याबाबतचा एसीबीचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला
computer operator jobs marathi news
२० हजार संगणक परिचालकांची सेवा संपुष्टात, नवीन नियुक्तीबाबत साशंकता, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
about waqf board loksatta loksatta analysis why opposition stand against waqf act amendment bill
विश्लेषण : वक्फ बोर्ड म्हणजे काय? केंद्र सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणांना विरोध का होतोय?
opposition strongly oppose bill to amend the waqf act 1995 by modi government
सुधारित वक्फ कायद्याला कडाडून विरोध; भाजप सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप
asaduddin owaisi
Waqf Board : वक्फ कायद्यातील प्रस्तावित सुधारणांवरून असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “आमच्या…”

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातला मराठा समाजाचा एक तरुण नेता अशा प्रकारे जीव पणाला लावत असेल आणि सरकार केवळ चर्चा, समित्या, उपसमित्या नेमण्यात गुंतून पडलं असेल तर ते योग्य नाही. कालच्या सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय झाले याबाबत बाहेर कोणाला काही पडलेलं नाही. तुम्ही अंमलबजावणी काय करताय? ते महत्त्वाचं आहे.

खासदार राऊत म्हणाले, येत्या १६ किंवा १७ सप्टेंबरला मराठवाड्यात कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्यांची कॅबिनेट बैठक मराठवाड्यात घेत आहेत. परंतु, त्या बैठकीआधी त्यांना मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण गुंडाळायचं आहे. म्हणून ही खोटी आश्वासनं, समित्या, उपसमित्या नेमण्याचे प्रकार सुरू आहेत. जेणेकरून त्यांच्या मराठवाड्यातील बैठकीला अपशकून नको. लोकांनी रस्त्यावर उतरू नये, लोकांनी बंद पुकारू नये, मंत्र्यांवर हल्ले करू नयेत, सत्ताधारी आमदारांच्या गाड्या फोडू नयेत या भितीपोटी त्यांना मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळायचं आहे.