भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार प्रकाश जावडेकर यांनी पनवेल येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी मोदींचे फोटो वापरून निवडून आले. आता त्यांनी मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. ही महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका जावडेकर यांनी केली.

प्रकाश जावडेकर आज मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना मावळ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात भाजपाचा खासदार असेल, असेही जावडेकर म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत आम्ही राज्यातील ४८ पैकी ४८ जागा जिंकणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यसभा जिंकली आता विधान परिषदेत पण गुप्त मतदान आहे. त्यामुळे सर्व जागा जिंकणार असल्याचा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

हेही वाचा- ‘अग्निपथ योजनेतून तरुणांची टिंगलटवाळी’, छगन भुजबळांची केंद्र सरकारवर टीका

पुढे बोलताना जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. कारण हे सरकार काहीच करत नाही. दुसरा पावसाळा आला तरी पहिल्या पुराचे पैसे मिळाले नाहीत. यांचा एकच किमान समान कार्यक्रम आहे, तो म्हणजे लूट लूट लुटायचं. महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराची सर्व विक्रम मोडीत काढली, असंही जावडेकर यावेळी म्हणाले.