मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे असं चित्र आहे असं म्हणत कांजूर कारशेडच्या जागेवरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने केलेला दावा धक्कादायक आहे असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. कांजूरमार्ग येथील कारशेडसाठीची जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याच राज्याचा त्या जमिनीवर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करतंय असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कटकारस्थान; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

loksatta analysis osama bin laden s son hamza is alive preparing to attack
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल कायदाचा म्होरक्या बनून ९/११ सारख्या हल्ल्याची तयारी करतोय? नवीन माहितीमुळे खळबळ!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
kolkata doctor rape case trinamool congress vs bjp controversy more intense after sc comment
सुनावणीनंतर राजकीय वाद; निदर्शनांमागे केंद्राचे कारस्थान बॅनर्जी; चेहरा उघड झाल्याची भाजपची टीका
Maratha reservation, Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“कांजूरमार्गच्या जागेवर केंद्र सरकारने केलेला दावा धक्कादायक आहे. ती जमी महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे अधिकार काढून घेण्याचं काम करतं आहे. त्यांच्या कृतीतून हेच दिसतंय हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. भाजपाचे नेते कोणत्या आधारावर आमच्यावर टीक करत आहेत? जमीन महाराष्ट्राच्या विकासासाठीच वापरली जाते आहे. या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडू अशी भाषा मी कधीच ऐकलेली नाही. सत्ता नसल्यामुळे भाजपाच्या नेत्यांना काही सुचत नाही. त्यामुळे ते बिचारे असं वागत असतील. कदाचित त्यांचा समतोल बिघडला असावा” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.

आणखी वाचा- भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य – सचिन सावंत

दरम्यान दिवाळीनंतर लग्नाचे हॉल उघडण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा, दिवाळीनंतर ते उघडण्यास हरकत नाही मात्र त्याचे बुकिंग करण्याची परवानगी द्या अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.