बारामती : ‘सरकार त्यांचं, सत्तेचा वापर त्यांचा’ हे पदवीधर आणि कसबा निवडणुकीत दिसून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मला जी माहिती मिळाली त्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी पोटनिवडणुकीवर भाष्य केले. कसबा पोटनिवडणुकीमध्ये दोन ठिकाणी अधिक मते मिळाली आहेत. हा बदल आहे, तो पुण्यात होत आहे याचा अर्थ लोक वेगळय़ा विचाराच्या प्रक्रियेत आहेत, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.

deep fake Aamir khan  Ranveer singh Victims of Deepfake Political Audio Tapes How to Identify Deepfake Technology print exp
आमिर, रणवीर करताहेत चक्क राजकीय प्रचार? नाही… हा तर डीपफेकचा भूलभुलय्या!
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत, प्रधानमंत्री आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेताही. या सर्वाना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले गेले. हा लोकशाही मधील चांगला निर्णय आहे, अशा शब्दांत पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

कांद्याच्या प्रश्नावर सरकार अपयशी

दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर असताना मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती मिळाली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.