यावर्षीचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा भीषण असल्याने या दुष्काळाच्या कळा सशक्त शब्दात मांडून शासनावर दबाव आणण्याची जबाबदारी पत्रकारांनी स्वीकारावी, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनी केले. विश्राम भवनावर आयोजित समारंभात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी होते. ‘पत्रकारांपुढील आव्हाने’, या विषयावर जावंधिया म्हणाले, आज उत्पादनही नाही व उत्पादनाला भावही नाही. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. पत्रकारांनी हे उद्ध्वस्त होत जाणारे जीवन लेखणीतून टिपावे, असे आवाहन त्यांनी केले.