सध्या महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू असून ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, अशी टीका शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केली आहे. सांगोल्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणाऱ्या भडभुंच्या लोकांना राज्यातली जनता माफ करणार नाही, असे म्हणाले.

हेही वाचा – “१४ दिवस कारागृहात राहणाऱ्या राणा दाम्पत्याचा मला अभिमान”; देवेंद्र फडणवीसांचं अमरावतीत वक्तव्य

conversation with mumbai bjp chief mla ashish shelar in loksatta office
ठाकरे, पवार यांना धडा शिकवायलाच हवा होता !
Sharad Pawar, Modi, Amul, fodder,
महाराष्ट्रात दुष्काळात चारा पाठविला म्हणून ‘अमूल’वर मोदींनी भरला होता खटला, शरद पवार यांचा आरोप
What Raj Thackeray Said About Sanjay Raut?
राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..”
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”

काय म्हणाले विनायक राऊत?

“महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू आहे. ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. हे मुख्यमंत्री राष्ट्रगीत सुरू असताना शर्ट खाली-वर करतात. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. ”जर तुम्हाला शिवसेनेशी गद्दारीच करायची होती. तर भाजपात जायचे होते. मात्र, या लोकांना आपली आमदारकी विकली, १२ लोकांना आपली खासदारकी विकली. ४० चोर गेले म्हणजे शिवसेनेचा परिवार संपत नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर पुन्हा टीका; म्हणाले, “गद्दारांना…”

“मुंबईत भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत मनपावर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. याचा अर्थ ते आता बाळासाहेबांच्या नावावर मत मागत आहेत. कारण मोदी पर्व संपलं आहे. आता मोदींच्या नावावर मत मिळणार नाही, हे कळलं तेव्हा बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणं सुरू झालं आहे. अशा भडभुंच्या लोकांना राज्यातली जनता माफ करणार नाही”, अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.