सर्वांनाच सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील दुरावा ठाऊकचं आहे. पण, असे असतानाही सलमानची सावत्र आई हेलन आणि ऐश्वर्याने आपल्यात कोणताही दुरावा नसल्याचे दाखवून दिले आहे. १६व्या मुंबई चित्रपट महोत्सवाचे (मामि) उदघाटन ऐश्वर्या राय बच्चनने केले. त्यावेळी बॉलीवूडच्या दोन सुंदर अभिनेत्रींची भेट झाली.
aish-helen1
एकेकाळी ऐश्वर्या आणि हेलन या दोघी सलमानच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होत्या. हेलन या सलमानच्या सावत्र आई तर त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमानमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. मात्र, ‘चलते चलते’च्या सेटवर सलमान आणि शाहरुखमध्ये झालेल्या भांडणानंतर हे दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर, ऐश्वर्याच्या जागी चित्रपटात राणी मुखर्जीला घेण्यात आल्याचीही तेव्ही चर्चा होती. पण आता ऐश्वर्या ही अभिषेकसोबत सुखी संसारात रमली आहे. तर दुसरीकडे सलमान अजूनही एलीजीबल बॅचलर आहे. सलमान-ऐश्वर्यामधील तणावामुळे बहुतेकांना असे वाटत होते की, हेलन यांच्याशी ऐश्वर्याचे नाते काही ठीक नसणार. पण, मामी महोत्सवात वेगळेच दृश्य पाहावयास मिळाले. दोघींनीही एकमेकींची हसून भेट घेतली.
आयुष्य हे फार छोटे असते. त्यामुळे जुने मतभेद सोडून नेहमीच पुढे जावे. याचे योग्य उदाहरण या बॉलीवूड सुंदरींनी दिले आहे.