रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्री साडेदहाचा प्राइम स्लॉट आणि हॉरर मालिका हे समीकरणच मुळात मराठी टेलीव्हिजनमध्ये नव्हतं. दोन वर्षांपूर्वी हे समीकरण पहिल्यांदा बसवलं गेलं झी मराठी वाहिनीवर आणि त्या स्लॉटमध्ये पहिली मालिका फिट बसली होती ती म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. पूर्णपणे कोकणात सावंतवाडीत चित्रित झालेली, तिथली भाषा, तिथली माती घेऊन आलेली ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली. इतकी की दोन वर्षांनंतरही या मालिकेतील दत्ता, माधव, छाया, अभिराम, नीलिमा, पांडू ही प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांना आजही चांगलीच लक्षात आहे. या मालिकेचे दुसरे पर्व येणार असे प्रोमो झळकू लागले आणि पुन्हा एकदा आनंदाची लहर उठली. प्रीक्वल ही संकल्पना मालिकाविश्वात पहिल्यांदाच आणणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’चा हा दुसरा अंकही प्रेक्षकांना आवडतो आहे. भूतप्रेत संकल्पना दाखवणारी मालिका म्हणून एके काळी टीकाही सहन केली आहे, मात्र यात भय कायम असलं तरी या भयाच्या भुताचा खेळ हाच मालिकेच्या कथेचा गाभा आहे, असं दिग्दर्शक राजू सावंत यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about ratris khel chale serial
First published on: 10-02-2019 at 00:40 IST