‘रानबाजार’ फेम अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार हिच्या भावाचे निधन झाले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. माधुरीच्या भावाचे १२ दिवसांपूर्वी निधन झाले. भावाच्या अचानक जाण्याने माधुरी आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिने पोस्टमध्ये भावाने केलेल्या मदतीचा व त्याच्या स्वप्नांचा उल्लेख केला आहे.

माधुरीने लिहिलं, “प्रिय अक्षय,

gangrape Nagpur
धक्कादायक! प्रियकराने दिला दगा अन् त्याच्या मित्रांनी सर्वस्व लुटले…
maheep kapoor onsanjay kapoor affairs
जान्हवी कपूरच्या काकूचं पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विधान; म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना…”
sushma andhare on raj thackeray (1)
“माझ्या नावाची सुपारी मिळणे…”, सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाल्या, “रमेश किनी हत्याकांड, कोहीनूर मिल आणि…”
Gurucharan singh father on son financial situation
बेपत्ता गुरुचरण सिंगच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्याचे वडील म्हणाले, “माझं वय झालं आहे, त्यामुळे…”
ayush sharma on divorce with arpita khan
अर्पिता खानपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर आयुष शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या मुलाला…”
deepak tijori on saif ali khan amrita singh
सैफ अली खान अन् अमृता सिंहबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर दीपक तिजोरीचं स्पष्टीकरण; म्हणाला, “त्यांनी एकमेकांना…”
police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
Sankarshan Kharhade tells the story behind the viral poem on the political situation
“१० ते १५ दिवस… “, संकर्षण कऱ्हाडे सांगितली राजकीय परिस्थितीवर व्हायरल होणाऱ्या कवितेच्या मागची गोष्ट, अभिनेता म्हणाला, “रोज रात्री….”

तुला जाऊन १२ दिवस झाले…हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही…उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, असं आपण बऱ्याचदा म्हणतो..खरंय उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखःद घटना घडण्यापासून थांबवू शकले असते. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की तू नाहीयेस ही कल्पनाच सहन होत नाहीये. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. मला तुझा खूप आधार वाटायचा. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरू करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी ‘नाही’ असं बोलला नाहीस. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही कामाला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतंस. कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास. कायम स्वतःपेक्षा बहिणींच्या कामाला प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल.”

पुढे ती म्हणाली, “तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं, ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झालीच नाही. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्षे रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनाचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण दिवाळीतील भाऊबीज आठवून जास्त त्रास होतोय. एका सावलीसारखा तू सोबत असायचा. पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?” यावेळी माधुरीने भावाची सर्व स्वप्ने पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, माधुरीच्या भावाचं आकस्मिक निधन झालं आहे. माधुरीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी कमेंट करून अक्षयला श्रद्धांजली वाहत आहेत.